जयवंत दळवी लिखित - चक्र, या कादंबरीमुळे गंभीर जीवनदर्शन आणि भेदक शैली हे त्यांचे विशेष जवळजवळ प्रथमच प्रकाशात येत आहेत. ही कादंबरी, गलिच्छ झोपडपट्टीत, गटाराच्या कडेशी जीवजंतू - प्रमाणे वळवळणाऱ्या मानवांच्या एका पुंजक्यावर इथे प्रकाशझोत टाकला गेला आहे. इथे जीवनाला कसलाच आधार नाही. माणसाच्या मूलभूत गरजा पुऱ्या होण्यापूर्वीच त्या इथे पिळवटून विकृत होतात. आणि सफल, सुंदर जीवनाची स्वप्ने प्रत्यक्षात येण्यापूर्वीच परिस्थितीच्या निष्ठुर, अप्रतिहत चक्रात त्यांचा चक्काचूर होतो. हेच जीवनाचे सत्य मांडण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे.