एका मध्यमवर्गीय तामिळ परंपरानिष्ठ कुटुंबातील जान्हवीची कथा अवकाश कादंबरीतून सानिया मांडतात. आयुष्यातील अनेक अनुभव जान्हवीला अचानक स्वतःची ओळख घडवतात आणि नविन होऊन आलेली लेखिका जान्हवी राघवन स्वतःपुढेच उभी ठाकते. स्व-सामर्थ्याच्या जाणीवांनी सजग होत जाणारी स्त्री- तिचे आत्मभान यांचा प्रतिकात्मक शोध अवकाश मध्ये आहे.