अवाढव्य नद्या आणि घनदाट अरण्ये ओलांडत सिध, बलजोत आणि झोबू प्रवास करतात. खाटेच्या ता-यावरील ती अनाम अद्भूत सुंदरी प्रेमव्याकूळ सिधच्या मनाचा पाहता पाहता ताबा घेते. अभेद्य तटबंदी आणि सिंधू नदीचे ते सागरासारखे पात्र सिधला थक्क करुन सोडतात! हाच प्रवास त्याला व त्याच्या वडिलांना एकमेकांजवळ आणेल काय ?