समाजाच्या जीवनात कधीकधी असा एखादा काळाकुट्ट कालखंड येतो की, ज्या वेळी नि:स्वार्थी व्यक्तींचा सारा त्याग मातीमोल होतो आणि सरळ मार्गाने जाणारी सर्वसामान्य माणसे तर केवळ हतबल होतात. स्वार्थी आणि कारस्थानी माणसांनी भरलेल्या या जगात सात्त्विक वृत्तीच्या माणसांची फरपट कशी होते आणि त्यांच्या ध्येयवादी जीवनाला अपयश कसे ग्रासून टाकते, याचे परिणामकारक दर्शन पुस्तकात घडते.